शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

आदरांजली देताना ..... 

आदरांजली देताना ..... 

"होती बेड्यांत अडकली पारतंत्र्याच्या,

कधीकाळी ही माझी सुंदर मायभूमी।

लढले वीर तेव्हा लढ्यात स्वातंत्र्याच्या,

जीव देता देशासाठी रक्तही न पडले कमी ॥

ही भूमी आहे शूरवीरांची, थोरांची,

जन्मास आला तो देशासाठी अमर झाला।

न जुमानता राजवटीस त्या गोर्यांची,

हर कुणी प्राण इथे वेचून जो लढला॥

ही लढाई होती अस्तित्वाची, अस्मितेची,

ज्यातूनी सर्वकाही आज आम्हास गवसले।

पण दैना का झाली या आता देशाची?

स्वार्थापायी लोक वीरांनाच विसरले ॥

कुठे बघतो स्वप्न आपण होण्यास महासत्तेचे,

एकीकडे व्यसन, दुसरीकडे वाद गुंफलेले।

वास्तविकता ही, हे दृष्य माझीया राष्ट्राचे,

स्वातंत्र्य हे जणू असे कल्पनागतच राहिले ॥

वेळ आहे अजून, काळ ओसरला नाही,

भारत काय, जगास हे आपण दाखवले आहे।

स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर करूया नवे काही,

जसे प्राण आपणासाठी त्यांनी वेचले आहे॥ 

हेची ओळी वीस मी इथे, शब्दरूपी तव कोरल्या।

जणू थोरांस ही आदरांजली, म्हणूनी आज वाहिल्या॥"

 

:- सागर बिसेन 

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

थेंबास बघताना ....

थेंबास  बघताना …… 

" पाऊस मुसळधार हा बरसताना,
बघितला टपोरा थेंब
पानावरून खाली गळताना…. 
तो प्रवास होता त्याचा,
शेंड्यापासून बुडापर्यंत पोहोचण्याचा!

अलगद टोकावरुनी सरळ,
आधार कधी पानाचा,
कधी देठाचा घेताना।
कधी विसावा पानावर 
घेत घेत…
मग हळूच खाली येताना 
लपंडाव करताना… 

तो दिसला मध्येच अचानक 
नजरेआड सहज अजूनी,
परत बघे डोकावून पानावरुनी !
 न संपे प्रवास इथेच आता. 
होता घेऊन आला रूप सुंदर 
तो थेंब टपोरा….

पण सहज बदलतसे रूप जागेनुसार,
कधी पानावर गोलाकार,
कधी देठावर चौकोनी,
कधी काठावर पर्णाच्या त्रिकोणी ।।

हसू येते हे सर्व बघुनी…
येत असावी त्यासही मजा 
टोकावरून खाली फांदीवर,
कधी देठावर, कधी पानावर,
कधी अलगदच फुलांवर…. 

हळूच खाली पोहचताना 
शेवट मातीतच होतसे त्याचा….
मी इथेच बसलोय गार वाऱ्यात.
त्याचा प्रवास रेखाटताना ……।।"


:- सागर बिसेन 
चिरेखणी, ता. तिरोडा 
९४०३८२४५६६